एकाचवेळी घेतलेल्या दोन पदव्या वैध; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा   

पुणे : विद्यापीठ अनुदान मंडळाने (युजीसी) विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत, एकाच वेळी मिळवलेल्या दोन पदव्यांच्या वैधतेबाबत स्पष्टता केली आहे. आयोगाने अलीकडेच जारी केलेल्या सूचनेनुसार, देशभरातील विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी एकाच वेळी घेतलेल्या दोन पदव्या आता वैध ठरणार आहेत.एप्रिल २०२२ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एकाच वेळी दोन शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर बंदी घालण्याची तरतूद होती. मात्र, युजीसीने ही तरतूद रद्द करत मोठा बदल केला आहे. ३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, ५ जून २०२५ रोजी तो अधिकृत संकेतस्थळावर जाहीर 
करण्यात आला.
 
नवीन नियमानुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याने णॠउ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांपूर्वी एकाचवेळी दोन अभ्यासक्रम निश्चित केलेल्या मानकांचे पालन करत पूर्ण केले असतील, तर त्या दोन्ही पदव्या वैध मानल्या जातील. मात्र, हे अभ्यासक्रम णॠउ, संबंधित विद्यापीठ किंवा विद्यापीठ कायद्यानुसार पहिल्या पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे, जर हे अभ्यासक्रम व्यावसायिक स्वरूपाचे असतील, तर त्यांना णॠउ च्या दूरस्थ शिक्षण परिषद किंवा दूरस्थ शिक्षण ब्युरो यांच्याकडून मान्यता मिळालेली असावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.युजीसीच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, एकाचवेळी विविध क्षेत्रांत शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांसमोर खुली होणार आहे. 

Related Articles