पाकिस्तानातील भूकंपानंतर पळाले २०० हून अधिक कैदी   

कराची/नवी दिल्ली : पाकिस्तानातील कराचीला मागील २४ तासांत भूकंपाचे अनेक धक्के बसले. तुरुंगातील कैद्यांना खबरदारी म्हणून बराकीतून बाहेर काढले जात असताना गोंधळादरम्यान २१६ कैदी पळून गेले. त्यातील ८० कैद्यांना पकडण्यात यश आले. मात्र, १३५ कैदी अद्याप फरारी आहेत, असे वृत्त पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी दिले आहे.
 
कराचीच्या मालीर तुरुंगात सोमवारी रात्री एका घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाला. तर, चार कर्मचारी जखमी झाले, असे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे. रविवारपासून पाकिस्तानात भूकंपाचे अनेक धकक्के जाणवत आहेत. मागील २४ तासांत कराचीला अनेक भक्के जाणवले. खबरदारी म्हणून ६०० हून अधिक कैद्यांना बराकीतून बाहेर काढले जात होते. त्यावेळी, गोंधळादरम्यान २१६ कैदी पळून गेले. त्यापैकी, ८० कैद्यांना पकडण्यात आले आहे. तर, १३५ कैदी अद्याप फरारी असून त्यांचा शोध सुरु आहे, असे तुरुंग अधीक्षक अर्शद शहा म्णहाले. सिंधचे गृहमंत्री झिया-उल-हसन लंजर यांनी याघटनेस दुजोरा दिला आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी घटना आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सर्व पळून गेलेल्या कैद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानांवर आणि आसपासच्या भागात छापे घातले जात आहेत.
 

Related Articles