विकास दर मंदावला   

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) देशाचा विकास दर ७.४ टक्क्यांपर्यंत मंदावला. मागील वर्षी याच तिमाहीत विकास दर ८.४ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.२ टक्के होता. तर, २०२४-२५ मध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.५ टक्के नोंदवला गेला.
 
दरम्यान, २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत (जानेवारी-मार्च) चीनचा विकास दर ५.४ टक्के नोंदवला गेला.जपानला मागे टाकताना भारताची अर्थव्यवस्था नुकतीच चौथ्या क्रमांकावर पोहोचली. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ३३०.६८ लाख कोटींवर म्हणजे ३.९ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढला. पुढील पाच वर्षांत भारताने ५ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०२४-२५ मध्ये विकास दर पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ६.५ टक्के, जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ५.६ टक्के, ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत ६.४ टक्के आणि अखेरच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) ७.४ टक्के होता. 

Related Articles