E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
युद्धाचा फटका भारत आणि पाकिस्तानलाही
Samruddhi Dhayagude
22 May 2025
वृत्तवेध
युद्ध कोणाचेही भले करत नाही तर सर्वांचे नुकसान करते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर, जगातील प्रत्येक देश आणि अर्थकारणाचा अभ्यास करणार्या एजन्सीज युद्धामुळे दोन्ही देशांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे सांगत आहेत. पाकिस्तानला तर दररोज चार अब्ज रुपये सैन्याच्या हालचालीवर खर्च करावे लागत आहेत.
जागतिक रेटिंग एजन्सी ‘एस अँड पी’ने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांसाठी क्रेडिट रिस्क वाढेल. ‘एस अँड पी’ने सध्या भारताला सकारात्मक दृष्टिकोनासह ‘बीबीसी’ रेटिंग दिले आहे तर पाकिस्तानला स्थिर दृष्टिकोनासह सीसीसी + रेटिंग दिले आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये सार्वभौम क्रेडिट रेटिंगवर कोणताही तात्काळ परिणाम दिसत नाही. पुढील दोन ते तीन आठवडे तणाव कायम राहण्याची अपेक्षा असून दोन्ही बाजूंकडून मोठी लष्करी कारवाई केली जाऊ शकते.
‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने एका निवेदनात म्हटले आहे, की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने प्रादेशिक पतधोका वाढला आहे. तीव्र लष्करी कारवाई तात्पुरती असण्याची शक्यता आहे. कर्ज घेणारी व्यक्ती, संस्था किंवा सरकार वेळेवर किंवा पूर्णपणे कर्ज किंवा व्याज परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास होणारा आर्थिक धोका म्हणजे क्रेडिट रिस्क. पाकिस्तान आधीच रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करत आहे. त्यामुळे वाढती ‘क्रेडिट रिस्क’ त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अधिक घातक ठरू शकते.
‘एस अँड पी’ने म्हटले आहे की, भारताची आर्थिक वाढ चांगली राहील आणि वित्तीय सुधारणा हळूहळू सुरू राहतील, अशी अपेक्षा आहे. सरकार आपली अर्थव्यवस्था सुधारण्यावर आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यावरही लक्ष केंद्रित करेल. दोन्ही देशांमध्ये सध्याचा तणाव जास्त काळ चालू ठेवण्याचा कोणताही आधार दिसत नाही. यापूर्वी, ‘रेटिंग एजन्सी’ने अमेरिकेच्या व्यापार धोरणावरील अनिश्चिततेचे कारण देत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला होता
Related
Articles
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
झारखंडमध्ये नक्षलवादी ठार
27 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
झारखंडमध्ये नक्षलवादी ठार
27 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
झारखंडमध्ये नक्षलवादी ठार
27 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली
28 May 2025
झारखंडमध्ये नक्षलवादी ठार
27 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
राज्यात मुसळधार
5
बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत
6
श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी