मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली   

काँग्रेसचा आरोप

इंफाळ : मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केशम मेघचंद्र यांनी केला आहे.या वर्षी जानेवारीमध्ये पदभार स्वीकारलेले राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना केंद्राने परत बोलावावे, असेही त्यांनी म्हटले आहे.राज्यात दीर्घकाळ उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 
 
मणिपूरमध्ये मे २०२३ मध्ये वांशिक हिंसाचार उसळला होता. हा हिंसाचार दीड वर्षांहून अधिक काळ कायम होता. या हिंसाचारात आतापर्यंत २६० हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहे. तर, हजारो नागरिकांना घर सोडावे लागले आहे.

Related Articles