जगबुडी नदीत मोटार कोसळून पाच जणांचा मृत्यू, दोघे जखमी   

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ दुर्घटना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सोमवारी सकाळी मोटार अपघातात पाच जणांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. जगबुडी नदीच्या कोरड्या पात्रात वेगाने धावणारी मोटार कोसळली होती.
 
खेडजवळ पहाटे पावणे सहा वाजता अपघात झाला. प्रथम मोटारीने दुभाजकाला धडक दिली आणि नंतर ती जगबुडी नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली होती. पालघर जिल्ह्यातील नालासोापारा ते देवरुख असा प्रवास मोटार करत होती. पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मिताली विवेक मोरे (वय ४३), मेघा पराडकर (वय २२) सौरभ पराडकर (वय २२), निहार मोरे (वय १९) आणि श्रेयस सावंत (वय २३) यांचा मृत्यू झाला. 
 
दुर्घटनेनंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य राबविले.अधिकार्‍यांनी सांगितले की, जगबुडी नदीत पाणी नव्हते. कोरड्या पात्रात दगडधोंडे होते. त्या भागात मोटार कोसळली. त्यामुळे घटनास्थळी पाच जणांचा मृत्यू झाला. जखमींवर रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खेड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुुरू आहे. 
 

Related Articles