E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हापूसचा हंगाम संपला; बाजारात तुरळक आवक
Wrutuja pandharpure
17 May 2025
पुणे
: कोकणातील हापूसचा हंगाम जवळपास संपला आहे. सद्य:स्थितीत बाजारात हापूसची तुरळक आवक होत आहे. ही आवकही येत्या चार ते पाच दिवसांत थांबणार आहे. यंदा राज्यात पाऊस उशिरापर्यंत होता. तसेच हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडली नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून यंदा झाडांना फळधारणा कमी होती. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम लवकर संपला असल्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
मार्केटयार्डातील फळ बाजारात कोकणातून १०० ते २०० पेटीची आवक होत आहे. ही आवकही येत्या चार ते पाच दिवसांत थांबणार आहे. घाऊक बाजारात एक डझनचा दर ३०० ते ६०० रूपये आहे, तर ४ ते ८ डझनाच्या पेटीचा दर १५०० ते ४००० आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत हापूसच्या उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली होती. झाडांना फळधारणा कमी असल्याने हंगाम उशीराने सुरू झाला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डझनाचे दर १०० ते २०० रूपयांनी अधिक होते. असेही काची यांनी नमूद केले. मागील वर्षीच्या हंगामात हापूसची आवक २० ते २५ हजार पेट्यांपर्यंत गेली होती. यंदाच्या हंगामात ८ ते १० हजार पेट्यांपर्यंत आवक झाली. सुमारे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आवक सुरू झाली होती.
यंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मोहोर फुलला होता, मात्र पाऊस पडल्याने हा मोहोर गळून पडला. पहिल्या मोहोरातील वाचलेले फळ आणि दुबार मोहोराचे फळानेच यंदा आंब्याचा हंगाम मे महिन्याच्या मध्यापर्यंत नेला आहे. बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसची आवक कमी झाली होती. चार दिवसांत इतर राज्यातील आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचे युवराज काची यांनी स्पष्ट केले.
यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका हापूसला बसला. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीपासूनच बाजारात आवक कमी होती. हंगाम उशीराने सुरू झाला आणि लवकर संपला. झाडांना फळधारणा कमी होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात १० हजार पेट्यांच्या वर आवक गेली नाही. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत दरही अधिक राहिले.
युवराज काची, व्यापारी मार्केटयार्ड.
चार दिवसांत आवक थांबेल
सद्य:स्थितीत मार्केटयार्डातील फळबाजारात कोकणात १०० ते २०० पेट्यांची आवक होत आहे. झाडांवर उरल्या सुरल्या फळांची ही आवक आहे. ही आवकही येत्या चार दिवसांत थांबेल. यंदाच्या हंगामातील ही शेवटची आवक असल्याने डझन आणि पेटीचे दर टिकून आहेत. आता इतर राज्यातील आंब्यांची आवक होईल.
अरविंद मोरे, व्यापारी मार्केटयार्ड.
Related
Articles
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बंगळुरूकडून लखनौचा पराभव
28 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात