दरवर्षी रस्ते अपघातात १२ लाख नागरिकांचा मृत्यू   

पादचारी आणि सायकलस्वारांची संख्या अधिक 

नवी दिल्ली : संपूर्ण जगासमोर असलेल्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू. दरवर्षी रस्ते अपघातात सुमारे १२ लाख नागरिक आपला जीव गमावतात, तर ५ कोटी नागरिक जखमी होतात. जागतिक स्तरावर पायी चालणार्‍या आणि सायकलस्वारांमध्ये दर ४ पैकी एकाचा मृत्यू होतो. या कारणामुळे जीव गमावलेल्यांचे वय ५ ते २९ वर्षांच्यामध्ये आहे. 
 
रस्ते अपघातांबाबत आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अपघातांमध्ये होणार्‍या मृत्यूंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू हे पायी चालणारे, सायकलस्वार आणि मोटारसायकलस्वारांचे असतात. यावर प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल स्टेटस रिपोर्टनुसार, दरवर्षी रस्ते अपघातांमुळे होणार्‍या एकूण १२ लाख मृत्यूंपैकी पादचार्‍यांची आणि सायकलस्वारांची संख्या अनुक्रमे २१ आणि ५ टक्के आहे. म्हणजेच, एकूण मृतांमध्ये त्यांची संख्या ३ लाखांहून अधिक आहे.
 
२०११ ते २०२० दरम्यान पादचार्‍यांच्या अपघाती मृत्यूंमध्ये थोडीशी घट झाली. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या आठव्या आवृत्तीत असे म्हटले आहे, की प्रत्येक देशातील सरकारने चालणे आणि सायकलिंग सुरक्षित करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. एका अंदाजानुसार २०३० पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के नागरिक शहरांमध्ये राहतील.

२०३० पर्यंत मृत्यू संख्या निम्म्यावर आणणार  

वाहतुकीची म्हणजेच वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०३० पर्यंत रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींची जागतिक संख्या निम्मी करण्याचे ध्येय ठेवले आहे. 
 

Related Articles