E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व
Samruddhi Dhayagude
15 May 2025
बदलते क्रीडा विश्व, शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली
कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना मी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ सोडण्याबाबत विचार केला होता. अखेरीस फ्रँचायझी, तसेच चाहते यांच्याकडून मिळणारे प्रेम आणि आदर याला प्राधान्य देत मी या संघाचाच भाग राहण्याचे ठरविले, असा खुलासा विराट कोहलीने केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने संघाच्या ’पॉडकास्ट’ मुलाखतीत कोहलीने विविध विषयांवर भाष्य केले. ’आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून एका संघाचा भाग असणारा कोहली हा एकमेव खेळाडू आहे. मात्र, या १८ वर्षांत बंगळूरु संघाला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही.
कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना, २०१६ ते २०१९ या कालावधीत अनेकांनी मला बंगळूरु संघ सोडण्याचा सल्ला दिला होता. एकवेळ अशी आली की, माझ्यासाठी सर्वच गोष्टी हाताळणे अवघड झाले होते. मी सात-आठ वर्षे भारतीय संघाचे, तर नऊ वर्षे बंगळूरु संघाचे नेतृत्व करत होतो. प्रत्येक सामन्यात मी फलंदाजीत काहीतरी खास करेन, अशी अपेक्षा बाळगली जायची. मी सतत प्रसिद्धीच्या झोतात होतो. कायम माझ्याविषयी चर्चा केली जात होती. त्यामुळे नक्की काय करावे, हेच समजेनासे झाले होते. मी अखेरीस बंगळूरु संघाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, क्रिकेटचा आनंद घेता यावा, यादृष्टीने मी कर्णधारपद सोडण्याचे ठरविले, असे कोहलीने सांगितले.
आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे, असा मी स्वतःला प्रश्न विचारला. नव्या संघाला माझ्याकडून काही अपेक्षा असणार आणि त्या पूर्ण नाही झाल्या, तर काय? ते माझ्याबाबतीत कितपत संयम बाळगणार? असे प्रश्न मला पडले. अखेरीस मी बंगळूरु संघ आणि चाहत्यांशी असलेल्या नात्याला महत्त्व दिले. ते माझ्यासाठी फार मौल्यवान आहे असे कोहली म्हणाला.
आताच्या काळात एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व कमी होत चालले आहे, असे म्हटले जाते. मात्र, एकदिवसीय क्रिकेट का महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा कोहलीने प्रयत्न केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळातील प्रत्येक गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. तुम्हाला कसोटीप्रमाणे संयम बाळगावा लागतो आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटप्रमाणे आक्रमकताही लागते. आता लोकांना सतत चौकार-षटकार पाहण्याची सवय झाली आहे. तसेच युवा खेळाडूही ट्वेन्टी-२० क्रिकेट पाहून आणि सपाट खेळपट्ट्यांवर खेळून मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांना एकदिवसीय क्रिकेटशी जुळवून घेणे अवघड जाते, असे कोहली म्हणाला.
Related
Articles
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भटक्या कुत्र्यांचा सतरा जणांना चावा
28 May 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भटक्या कुत्र्यांचा सतरा जणांना चावा
28 May 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भटक्या कुत्र्यांचा सतरा जणांना चावा
28 May 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भटक्या कुत्र्यांचा सतरा जणांना चावा
28 May 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात