भारतीय जवान मायदेशात   

 

अमृतसर : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान पुरन कुमार शॉ बुधवारी मायदेशी परतले. २१ दिवसांपूर्वी त्यांना आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानी सैनिकांनी पकडले होते. पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर (अटारी वाघा) अखेर त्यांना काल भारताकडे सोपविले आहे. 
 
सीमा सुरक्षा दलात (बीसएएफ) कॉन्स्टेबल असलेले पुरन कुमार शॉ यांची सुटका करण्यात आली. संयुक्त चौकीवर सकाळी साडेदहा वाजता त्यांना भारताकडे सोपविण्यात आले, अशी माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली. हिरवा टी शर्ट, विस्कटलेले केस आणि दाढी अशा रुपात ते दिसले.  दरम्यान, २३ एप्रिल रोजी फिरोजपूर विभागात कार्यरत असताना ते चुकून पाकिस्तानी हद्दीत गेले होते. सीमेवरील शेतकर्‍यांच्या सुरक्षेचे काम किसान गार्डकडे आहे. त्या विभागात ते कार्यरत होते. जेथे ते सुरक्षा करत होते. तेथील शेतकर्‍याची जमीन कुंपणाबाहेर होती. नजरचुकीने ते आतंरराष्ट्रीय सीमा ओलांडून एका झाडाखाली बसले. तेव्हा त्यांना पकडण्यात आले होते. ा सुटकेनंतर वैद्यकीय तपासणी तसेच समुपदेशन करण्याबरोबर २१ दिवसांतील घडोमोडीवर प्रश्नही विचारले जाणार आहेत. ते बीएसएफच्या २४ व्या बटालियनचे आहेत. त्यांनी सीमा कशी ओलांडली का ? की पाकिस्तानी सैनिकांनी जाणून बुजून अटक केली ? याबाबतच्या तपशीलाची माहिती घेण्यासाठी त्यांची अधिकारी चौकशी करतील. जवानाच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम शांततेत आणि पारंपिरक शिष्टाचारात पार पडला आहे.  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ध्वज बैठकीत जवान शॉ यांच्यासुटकेबाब बैठक झाली होती. त्यामुळे त्यांची सुटका सुखरूपपणे झाल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शॉ मूळचे पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांच्या सुटकेचा प्रश्न गंभीर बनला होता. पतीची सुटका कधी होणार ?, असा प्रश्नही त्या सीमा सुरक्षा अधिकार्‍याकडे वारंवार विचारत देखील होत्या.
 
पकिस्तानी सैनिकही परतला
 
राजस्तान सीमेवरील श्रीगंगानगर येथे एका पाकिस्तानी सैनिकाला पकडण्यात आले होते तो काही दिवसांपूर्वी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आला होता. सीमा सुरक्षा दलाने कारवाई करुन त्याला तब्यात घेतले होते. त्यालाही शॉ यांना परत घेताना पाकिस्तानी सैनिकांकडे सोपविण्यात आले.

Related Articles