‘मिशन वात्सल्य’ योजनेला मंजुरी   

मुंबई, (प्रतिनिधी) : शिक्षण आणि  आरोग्य यासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणार्‍या रस्त्यावरील अनाथ मुलांसाठी ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत फिरते पथक योजना राबविण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ही योजना राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक तसेच मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण ३१ फिरती पथके सुरू करण्यात येतील. या योजनेतंर्गत मुलांना वयानुसार अंगणवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देण्याबरोबरच अनाथ, एकल मुलांना बालगृहात दाखल केले जाणार आहे. 
 

Related Articles