सिंधू पाणी करार पूर्ववत करा   

अन्यथा शस्त्रबंदी धोक्यात 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची धमकी 

इस्लामाबाद :  सिंधू पाणी करार पूर्ववत करा, अन्यथा शस्त्रबंदी धोक्यात येईल, अशी धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने तातडीने सिंधू पाणी करार स्थगित केला. त्यानंतर दोन्ही देशांनी क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांत शस्त्रबंदी झाली, असा दावा त्यांनी केला.दार म्हणाले, नद्यांचे पाणी भारताने थांबविल्याने पाकिस्तानची स्थिती गंभीर झाली आहे. नागरिकांबरोबरच शेतकर्‍यांसाठी देखील पाणी महत्त्वाचे आहे. आता जर सिंधू पाणी करार पूर्ववत झाला नाही, तर शस्त्रबंदी धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील बैठकीत यावर चर्चा व्हावी. जर पाणी कराराचा प्रश्न सुटला नाही, तर तो युद्धाचा निर्णय मानला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा प्रादेशिक शांततेसाठी महत्त्वाचा आहे. जर काश्मीर प्रश्न सुटला नाही, तर कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करणे देखील कठीण होईल, असे दार यांनी नमूद केले.

Related Articles