भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे   

कोलकाता न्यायालयाने फटकारले

कोलकाता : भाषण स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती आणि समाजाच्या भावना दुखवणे नव्हे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने एका सुनावणीत मंगळवारी स्पष्ट केले. तसेच शमिष्ठा पनोलीला हंगामी जामीन देण्यास नकार दिला. ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात इन्स्टाग्रामवर वादग्रस्त मजकूर आणि  चित्रफीत तिने टाकली होती.. नंतर टीका झाल्यावर  ती काढून टाकली होती. या प्रकरणी न्यायाधीश पार्थ सारथी चॅटर्जी यांच्या न्यायालयात प्रकरण सुनावणीस आले. तेव्हा न्यायाधीशांनी सांगितले की, भाषण स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण, त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही नागरिकांंच्या संवेदनांना दुखवू शकत नाही. देश विविधतेने नटला असून विविध जाती, पाती, धर्म नांदत  आहेत. आम्ही अत्यंत खबरादरीने सांगतो की, उद्या स्वर्ग खाली पडणारच नाही. समाज माध्यमांवरील चित्रफीत समुदायाच्या संवेदनाना दुखवणारी आहे. दरम्यान, शर्मिष्ठा पनोली (वय २२) मूळची पुण्याची रहिवासी आहे. 

Related Articles