राजौरी : जम्मू प्रदेशातील राजौरी जिल्ह्यातील नागरी भागात अनेक न फुटलेले गोळे आढळले आहेत. त्यामुळे, कोणत्याही नागरी भागाला लक्ष्य करण्यात आले नव्हते, या पाकिस्तानच्या दाव्याचे खंडन झाले आहे.पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तर, पाकिस्तानकडून नागरी भागात सातत्याने गोळीबार आणि तोफांचा भडिमार करण्यात आला. यामध्ये २७ भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानचे सर्वच ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने परतावून लावले आहेत. त्यामुळे, बिथरलेल्या पाकिस्तानने नागरी भागास लक्ष्य करण्यास सुरूवात केली.राजौरीच्या नागरी भागात न फुटलेले तोफगोळे आढळले आहेत. त्यावरुन, पाकिस्तानने नागरी भागांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Fans
Followers