अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडविण्याची धमकी   

पाकिस्तानातून आले चार वेळा फोन 

अमरावती : भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असतानाच पाकिस्तानने अमरावतीतील कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. +९२ च्या  क्रमांकावरून एका व्यक्तीच्या व्हाट्सअ‍ॅपवर ४ वेळा ऑडिओ कॉल आले. त्यामध्ये नांदगाव पेठच्या कारखान्यातील कर्मचारी आणि कारखाना बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली. 
   
या धमकीनंतर कारखान्यातील कर्मचार्‍यांनी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिस हायअलर्टवर आहेत. अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास तो न उचलण्याच्या सूचना अमरावती पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिल्या आहेत. तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या अमरावती शहर पोलिसांची समाजमाध्यमावर करडी नजर आहे. अमरावती पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

Related Articles