E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तान फार काळ दबाव झेलू शकणार नाही : सौरव गांगुली
Wrutuja pandharpure
11 May 2025
कोलकाता
: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मशाला येथील मैदानात रंगललेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना थांबवल्यावर दुसर्या दिवशीच आयपीएल स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय आधीच घ्यायला हवा, होता असाही सूर उमटताना दिसतोय. त्यात आठवड्याभरानंतर स्पर्धा पुन्हा सुरु करणे शक्य होईल का? हा नवा प्रश्न चर्चेत आहे. यासंदर्भात बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आणि दिग्गज क्रिकेटर सौरव गांगुलीनं मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान अधिक काळ भारताचा दबाव सहन करू शकत नाही, त्यामुळे आयपील स्पर्धा लवकर पुन्हा सुरु होईल, असे गांगुलीने म्हटले आहे.
सौरव गांगुली म्हणाले आहे की, देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडू सहभागी आहेत. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्पर्धा लवकरच पुन्हा सुरु होईल, अशी आशा करुयात. कारण स्पर्धा महत्त्वपूर्ण टपप्यात आहे. सौरव गांगुली पुढे म्हणाला की, बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला कारण, स्पर्धेतील सामने हे, धर्मशाला, चंदीगड, दिल्ली, राजस्थान आणि जयपूर याठिकाणी आहेत. जे घडलं त्या परिस्थितीनुसार, स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते. ही परिस्थितीत लवकर सुधारेल आणि आयपीएलमधील सामने पुन्हा खेळवले जातील. पाकिस्तान फार काळ दबाव सहन करू शकणार नाही, त्यामुळे बीसीसीआय खझङ स्पर्धा सुरळीत पार पाडू शकेल, असे मतही गांगुलीने व्यक्त केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत अधिक काळ कायम राहिली तर बीसीसीआयला आठवड्याभरात पुन्हा स्पर्धा सुरु करणं शक्य होणार नाही. या परिस्थितीत बीसीसीआयकडे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा पूर्ण करण्याची एक विंडो उपलब्ध असेल.या दरम्यान भारताचा बांगलादेश दौरा आणि आशिया कप स्पर्धाही नियोजित आहे. भारत-पाक यांच्यातील तणावामुळे भारताच्या बांगलादेश दौर्यावरही संकटाचे ढग दाटून आले आहे. याशिवाय आशिया कप स्पर्धेतील सहभागाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परिस्थितीत बोर्ड आयपीएल स्पर्धा पूर्ण करण्याचा प्लॅन आखू शकते.
Related
Articles
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय