पाकिस्तानचे सहा हवाई तळ उध्वस्त   

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेना भारताच्या 'सिंदूर' ऑपरेशन नंतर तीन दिवस भारतावर हल्ला करत आहे. मात्र भारतीय सशस्त्र दल त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहे. या सर्व घडामोडींमध्ये ९ मे च्या रात्री पाकिस्तानने नेमके कुठे आणि कसे हल्ले केले? याबाबत कर्नल सोफिया कुरेशी यांनी सकाळी सविस्तरपणे माहिती दिली. 
 
पाकिस्तान सेनेने पश्चिम भागावर सतत आक्रमण सुरू ठेवले. ड्रोन्स, लाँग रेज वेपन्स, लढाऊ विमानांचा वापर करत भारताच्या पायाभूत सेवांना लक्ष्य केले. सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमा LOCवर श्रीनगरपासून नलियापर्यंत २६ ठिकाणांवर हवाई घुसखोरी करण्याचा प्रयत्न केले. भारतीय सशस्त्र दलाने यशस्वीपणे या हल्ल्याला परतावले. तरीही वायुसेनेचे तळ असलेल्या पठाणकोट, उधमपूर, आदमपूर आणि भटिंडा स्थानकांचे नुकसान केले. पाकिस्तानने पंजाबच्या हवाई तळावर रात्री १ वाजून ४० मिनिटांनी वेगवान क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्नही केला. पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूरच्या वैद्यकीय सेवा केंद्र आणि शाळांवरही हल्ले केले. यामुळे नागरिकांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा बेजबाबदार वर्तन दिसून आले. 
 
पाकिस्ताने जाणूनबुजून हल्ला केल्यावर चोख प्रत्युत्तर दिले. टेक्निकली इन्स्टॉलेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि रडार साईट्स हत्यार भंडारे लक्ष्य केले. रफिकी मुरीद, चकलाला, रहमियान खान, सुकुर आणि चुनिया पाकिस्तानच्या या ठिकाणी हवाई हल्ले केले. सियालकोटचा हवाई तळ हि लक्ष्य केले. भारताने ही कारवाई करताना कमीत कमी नुकसान होईल याची खबरदारी घेतल्याचे सोफिया कुरेशी यांनी म्हटले आहे. यावेळी पाकिस्तानवर प्रतिहल्ला केल्यावर त्याचे व्हिडीओही दाखवले.
 
पाकिस्तानने लाहोरवरून उडणाऱ्या नागरी विमानाचा फायदा घेत दुरूपयोग केला. नागरी विमानाच्या आडून आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचा दुरूपयोग केला कारण त्यांचे कृत्य त्यांना लपवायचे होते. त्यासोबतच पाकिस्तानने चुकीची माहित पसरवत आदमपूर S-400 प्रणाली, सूरतगड आणि नगरोटाचे ब्राम्होस बेस, टेहेळणीच्या तोफा उडवल्याचा खोटा दावा केल्याचे सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
 
सीमेवर ड्रोन घुसखोरी, अदाधुंद गोळीबीराचे बरेच प्रयत्न केले. कुपवाडा, बारामुल्ला, राजोरी आणि पुंछ भागात तोफ, मोटार आणि हलक्या हत्यारांनी गोळीबार सुरू ठेवले. मात्र य हल्ल्याला भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या सैनिकांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र अशाने हा तणाव आणखी वाढू शकतो. आम्ही पुन्हा सांगतोय हा तणाव आणखी वाढवू नका. पाकिस्ताननेही असेच वागावे ,असे ही सोफिया कुरेशी म्हणाल्या.

Related Articles