अक्कल असेल तर पाकिस्तानने बंदुका शांत ठेवाव्यात   

उमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा

श्रीनगर : पाकिस्तानने नागरी वस्त्यांना लक्ष्य केले आहे. यात निष्पाप नागरिक मारले जात आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सीमेजवळचे अनेक नागरिक बेघर होत आहेत. पाकिस्तानला अक्कल असेल तर त्यांनी बंदुका शांत ठेवाव्यात, असा सज्जड दम जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला पाकिस्तानला दिला. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात अनेक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली.  सीमेवर नागरिकांना लक्ष्य केले गेले. तेथील नागरिक सध्या सांबा येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित आहेत. गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या स्थानिकांसाठी सांबा येथे उभारलेल्या छावणीची अब्दुल्ला यांनी पाहणी केली. 
 
यावेळी ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. पाकिस्तान परिस्थिती आणखी चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. पहलगाममध्ये निष्पाप लोक मारले गेले आणि आपल्याला त्याचे प्रत्युत्तर द्यावे लागले. 
 

Related Articles