E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पंजाब, राजस्तानमध्ये अतिदक्षतेचा इशारा
Samruddhi Dhayagude
09 May 2025
सुट्या रद्द; शाळा बंद
चंडीगढ/जयपूर : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि राजस्तानमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून सर्व पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकार्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे अधिकार्यांनी गुरुवारी सांगितले.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मिरात कारवाई केली. यामुळे उभय देशांतील तणाव आणखी वाढला आहे. पंजाबची ५३२ किलोमीटरची आणि राजस्तानची १,०७० किलोमीटरची सीमा पाकिस्तानला लागून आहे.पंजाब पोलिसांनी सर्व कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तर भगवंत मान सरकारने सहा सीमावर्ती जिल्ह्यांमधील शाळा बंद केल्या आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
राजस्तान सरकारनेदेखील सीमावर्ती भागात तैनात असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावा लागला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले आहे. पंजाब सरकारने सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या रजा ७ मे पासून रद्द केल्या आहेत. विशेष परिस्थितीतच रजा मंजूर केल्या जातील, असे पोलिस महासंचालकांनी सांगितले.पंजाबच्या सीमावर्ती भागातील फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन जिल्ह्यांतील सर्व शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असे सरकारने जाहीर केले आहे.
पंजाबची ५३२ किलोमीटरची सीमा पाकिस्तानला लागून आहे. भारत आणि पंजाबमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सीमेजवळील सर्व जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, असे पंजाबचे मंत्री अमन अरोरा यांनी सांगितले.
राजस्तानमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून श्री गंगानगर, बिकानेर, जैसलमेर आणि बारमेर या चार सीमावर्ती जिल्ह्यांमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या चार जिल्ह्यांतील प्रशासनाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी केली आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.’ऑपरेशन सिंदूर’ नंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत.
Related
Articles
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
ते गोमांस नसल्याचे अहवालात उघड
29 May 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
6
सोलापूरात विमानसेवा सुरू