दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील   

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष एकत्र येत असतील तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.विखे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे आणि आता जर ते एकत्र येत असतील तर आम्ही आक्षेप घेण्याचे कारणच नाही, ही त्यांच्या पक्षांचा निर्णय आहे, तो त्यांनी घ्यावा. दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करावे किंवा स्वतंत्र राहावे की, अगदी दोनही राष्ट्रवादी  विलिनीकरण करून तिसरा पक्ष काढावा हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. 
 
दरम्यान, त्यांची विचारधारा नेमकी काय आहे, हे त्यांनाच विचारावे लागेल. कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे. हेच मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्यास निश्चितच ताकद वाढणार असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले. सिंचन भवनात पार पडलेल्या बैठकीत ते उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
जानकर म्हणाले, सोलापूरचे आम्ही चार आमदार दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो. तेसच शरद पवार साहेबांशी सुद्धा याविषयी बोलणे झाले होते, असेही स्पष्ट केले.अजित पवार यांच्यावर टीका करूनही त्यांनी मला विकास कामांसाठी मदत केली. माझ्या मतदारसंघात कामे केली. त्यांच्या मनात कोणताही द्वेष दिसला नाही. मतदारसंघात कामे असताना अडचणी असतात. त्यामुळे सरकारची गरज असतेच असे सांगून जानकर शेवटी म्हणाले, पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल.

Related Articles