ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार : एकनाथ शिंदे   

आज खर्‍या अर्थाने पहलगामध्ये प्राण गमावलेल्या भारतीयांच्या हत्येचा बदला आपण घेतला,  अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मंगळवारी  मध्यरात्रीनंतर पाकिस्तानमधल्या ९ दहशतवादी तळांवर झालेला एअर स्ट्राईक हा प्रत्येक देशवासीयांच्या मनाला समाधान देणारा होता.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करारी बाणा यातून दिसला. 
 
भारत हा शांतताप्रिय देश आहे.  मात्र आडवे येणार्‍या शत्रूला प्रसंगी गुडघे टेकायला लावतो हा संदेश स्पष्टपणे जगभर गेला. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमधल्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार असून यापुढे या दहशतवाद्यांची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. प्रत्येक भारतीय आज लष्कराच्या बरोबर आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles