अडीच आघाडीवरील युद्ध आणि भारतीयत्वाची कसोटी   

समाज मनाचा कानोसा :सुरेश मुरलीधर कोडीतकर मो. नं. ९५४५५२५३७५

जम्मू काश्मीरला देशापासून अलग करणारे कलम ३७० केंद्रातील मोदी सरकारने रद्दबातल केले. त्यानंतर जम्मू काश्मीर खोर्‍यातील वातावरण झपाट्याने शांतता, व्यापार/उदीम, पर्यटन, विकास या दिशेकडे वळले. आणखी सुधारणेसाठी वाव आणि वेळ हवा होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने थेट निवडणूक करा, असा आदेश दिला. राज्याचे अधिकार केंद्रशासित प्रदेशाकडून निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाकडे ते गेले. राज्याच्या अखत्यारित सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही स्थानिक सुरक्षा यंत्रणेची असते. 
 
जून महिन्यापासून अमरनाथ यात्रा सुरु होते. त्या यात्रेसाठी पहलगाम हे बेसकॅम्प म्हणून काम करते. मग, ते स्थान एप्रिलमध्ये उघडण्याआधी केंद्राला, सैन्याला जम्मू काश्मीर सरकारने पूर्वकल्पना दिली होती काय? अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे भारतात असताना आणि पंतप्रधान सौदी अरबच्या दौर्‍यावर असताना पहलगाम येथे अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांना वेचून ठार मारले. सुवासिनींना टिकली काढायला सांगून त्यांचे कुंकू पुसण्याचे पाप अतिरेक्यांनी केले. मोदींना सांगावा द्या, असे विलाप करणार्‍या महिलांना सांगून अतिरेकी पळून गेले. भारतीयांच्या मनाचा कानोसा घेतला, तर जम्मू काश्मीर हा सर्वांचा  भावनिक मुद्दा असल्याचे स्पष्ट होते. तथापि, पाकिस्तानचा तो सूड, व्देष, असूयेचा मुद्दा आहे.
 
भारताची फाळणी द्विराष्ट्र मुद्द्यावर झाली होती. आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आम्ही हिंदूंसोबत राहू शकत नाही, अशी दर्पोक्ती करून मुस्लीम लीगचे अध्यक्ष जीना यांनी स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली होती. फाळणी झाल्यावर पाकिस्तानातून कसाबसा जीव वाचवून हजारो हिंदू नेसत्या वस्त्रानिशी भारतात आले. दुर्दैवाने त्याकाळी प्रसारमाध्यमे, शिक्षण उपलब्धता मर्यादित होती, तत्कालीन सत्ताधारी यांचे पाकिस्तानप्रेम, मुस्लीम अनुनय यांची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, सन १९९० चा काश्मिरी पंडितांचा संहार ते नुकताच झालेला पहलगाम हल्ला, ही सर्व त्याचीच  उदाहरणे आहेत. सन १९४७ पासून रुजलेले देशविरोधी धोरणे, कायदे, विचार, कारवाया यांना नेस्तनाबूत करण्याचे काम विद्यमान केंद्र सरकारने केले असताना हिंदूविरोधी इको सिस्टीम मात्र सातत्याने कुरघोडी करत राहिलेली आहे. त्यात फेक नरेटीव्ह चालवणारे, दलाल पत्रकार, एचएमव्ही भोंगा, विकाऊ मिडिया, अवॉर्ड वापसी गँग, असहिष्णुता टोळी, अर्बन नक्स्लाईट हे सारे सामील आहेत.

कट्टरतेचा आधार

भारताला नेहमीच अडीच आघाडयांवर लढावे लागणार आहे, असे देशाचे पहिले सरसेनापती जनरल बिपीन रावत यांनी बजावून ठेवले होते. कारण आपले शेजारी अन शत्रू पाकिस्तान आणि चीन आहेत. या दोन्ही देशांचे नाक ठेचण्याचे काम आपण अगदी डोकलाम आणि उरी-बालाकोट पर्यंत केलेले आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्या कट्टरतेचा आधार बिगर मुस्लिम सर्व काफिर हा आहे. दुर्दैवाने, सन १९४७ पासून अहिंसावादी सत्ताधीश पक्षाने मुस्लिमांच्या आक्रमकतेपुढे इतर पंथीयांच्या गळ्यात सर्वधर्मसमभाव अडकवला आणि नकली भाईचारा उभा केला. घटनाकारांनी घटनेत समाविष्ट न केलेली धर्मनिरपेक्षता अनुचित घटनादुरुस्ती करून बळेच घटनेत समाविष्ट केली. मुस्लिम अनुनयचा हा कुरूप परिचय होता. सोयीस्कर शरिया, लोकसंख्यावाढ, सर्व संसाधनावर प्रथम अधिकार, सवलती, अनुदान, जमीन लाटण्यासाठी वक्फ, आक्रमकांनी जमीनदोस्त करून उभारलेल्या विवादास्पद प्रार्थना स्थळांवर दावा हे सगळे इतिहासकालीन मुस्लिम आक्रांता आणि जीना कुविचारांचे परिपाक होते. त्याचाच परिपाक म्हणजे भारताशी कृतघ्नता आणि इस्लामी पाकिस्तानबद्दल प्रेम. या वास्तवात ही अर्धी आघाडी भारतात स्थानिकांच्या विरोधात पुढे आली, तर सीमेवरील युद्धापेक्षा देशांतर्गत अराजक मोठे असेल असाच जनरल बिपीन रावत यांच्या इशार्‍याचा अर्थ आहे.

दहशतवादाचे मूळ धार्मिक शिक्षण

तत्कालीन सत्ताधीशांचे मुस्लीम अनुनयाचे धोरण याचा फायदा घेत पाकिस्तान, दहशतवाद, नकली नोटांचे विश्व, अनुदान लुट, धर्मांतर, वक्फव्दारे जमीन लुट, लव्ह जिहाद, गुंडागर्दी, लांगुलचालन, बॉम्बस्फोट, विमान अपहरण, कारगील, हिंदू पंडितांचे शिरकाण, मुंबईवरील २६/११ हल्ला हे सर्व घडत राहिले.  या सर्वाने हा देश रक्तबंबाळ झाला स्थानिकांच्या मदतीनेच देशाच्या शत्रूंनी हे घडवून आणले आहे, हे सूत्र यातून दिसून आले आहे. इशरत जहाँ, ओसामा बिन लादेन, बुर्‍हाण वाणी, अफजल गुरु, जाकीर नाईक, कसाब, यासीन मलिक या देशशत्रूंचा काँग्रेसने नेहमी सन्मान का केला, याचा शोध देशवासी घेत आहेत. मुस्लीम अनुनय आणि  देशहिताला तिलांजली असे धोरण सन १९४७ पासून राबविल्यामुळे दहशतवाद संपवणे देशाला शक्य झालेले नाही हा अडीच आघाडीवरील तर्काचा आधार आहे. कारण कायदा हातात घेणार्‍या घोषणा, पाकिस्तानचे झेंडे नाचवणारा समाज, पहलगाममध्ये हल्ला होऊनही पाकिस्तानप्रति आस्था व्यक्त करणार्‍या मुस्लीम नागरिकांच्या क्लिप्स, आनंद व्यक्त करणारे स्टेटस ठेवणारे तरुण यातून सर्वातूनही हेच प्रतीत होते. इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नाही, धर्म विचारून हिंदूंना टिपले याचा कडाडून विरोध करणारे मुस्लीमही अजून दिसलेले नाहीत. 
 
अडीच आघाडीतील अर्धी आघाडी ही देशविरोधी कट्टर मुस्लीम, धर्मांध मदरसावादी शिक्षण याची आहे. मुर्शिदाबादमध्येही हिंदूंच्या घरादाराची राखरांगोळी करणे, पहलगाम येथे हिंदूंना गोळ्या घालणे हे सर्व  अर्धी आघाडी कपटी, घात लावून ठार मारणारी आहे हे स्पष्ट करते. दुर्दैवाची बाब म्हणजे  त्यांचा मजहब हे हिंसात्मक अमानुष कृत्य योग्य मानतो.

पहलगाम धोक्याची घंटा

पहलगाम घटना ही हिंदूंच्या जगण्याला दहशतवाद काडीची किंमत देत नाही हे पुनश्च दाखवून देते. कारण सन २०४७ पर्यंत गझवा ए हिंद चे स्वप्न साकार करायचेच आहे, असे सिमी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडे असलेल्या गोपनीय कागदपत्रातून हे उघड झाले आहे. काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ येथून हिंदू, आदिवासी, ख्रिश्चन यांना हटवायचे काम सतत सुरु आहे. देशभर धर्मांध लोकांचे अड्डे आणि स्लीपर सेल कार्यरत आहेत. धर्मांध संघटीत आहेत. हिंदू, जैन, शिख, बौध्द, खिस्ती हे विस्कळीत आहेत. सन १९४७ पासून हिंदूंना अहिंसा, गंगाजमनी तहजीब, या गुंगीत अडकवून आणि जातीय विभागणीत गुरफाटून सत्तेचा लाभ काँग्रेसने चाखला पण मार कायम हिंदूंनी खाल्ला आहे. सण, मिरवणूक, संस्कृती, यावरील आक्रमण हिंदू  सहन करतोय. आणि आता पहलगाम येथे हिंदू असल्याची खात्री करून गोळ्या घातल्या हे सारे धोक्याची घंटा वाजवणारे ठरणार आहे. कारण समाजमन आता प्रक्षुब्ध आहे. पाकिस्तान तर अप्रिय असतानाचा आता काश्मिरियत भारतीयत्वात एकरूप न होता ती हिंदुना केवळ पर्यटनापोटी लुट आणि दहशतवादासाठी सावज म्हणून पाहते आणि यामागेही पंथीय एकतेद्वारे काफिर ठेचा ही विकृती आहे, हे समजल्यावर तर आज समाजमन धुमसत आहे. आज हिंदूंच्या हत्येबद्दल जे नकाश्रू ढाळत आहेत, ते मनाने पाकिस्तानशी मात्र जोडलेले आहेत. या वास्तवाचा कानोसा जर कोणाला समजत नसेल तर ते सत्यापलाप करत आहेत हे निःसंशय समजून जावे.  
 
पहलगाम येथे हिंदूंच्या हत्येचे समर्थन अल तकैय्या यात आहे. यानुसार काफिरांच्या हत्या योग्य काम आहे. जोपर्यंत अल्पसंख्य आहोत तोपर्यत सर्वधर्मसमभाव हे ढोंग वठवायचे आणि घात लावून काफिरांना यमसदनी धाडायचे. संपूर्ण भूमी  दारूल इस्लाम करायची. तोपर्यंत गोडी गुलाबीचे नाटक म्हणजे अल तकैय्या. मुस्लीम मातृभूमी मानत नाहीत आणि त्यांच्या पंथात बंधुभाव नाही, हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे. जोपर्यंत सर्व मुस्लीम पाकिस्तानात जात नाहीत तोपर्यंत फाळणी अपूर्ण आहे असे त्यांचे म्हणणे होते. पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील हिंदू, दलित, इतर पंथीय नामशेष झाले. मात्र भारतात मुस्लीम कोटीकोटीने वाढले. 
 
पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असे म्हटल्यावर पाकिस्तानी नवरा आणि नागरिकता असलेल्या २५ लाख स्त्रिया आढळून आल्या आहेत. प्रत्येकीला किमान ५ ते ८ अपत्ये आहेत. या महिला आणि त्यांची मुले भारतात सर्व लाभ घेऊन भारताचे वासे मोजत आहेत. स्थानिक स्तरावर ही जी अर्धी आघाडी आहे तिच्याशी समाजाला लढावे लागणार आहे. हिंदू पापभिरू समाज याला तोंड कसे देणार ?

पाणी, बहिष्कार, भारतीयत्व  

कालच ऑपरेशन सिंदूर भारताने राबवले आहे. दहशतवाद्याचे ९ तळ उद्धवस्त केले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर मिळाले आहे. सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे. त्याने पाकिस्तान अन्न आणि पाण्याला महाग होणार आहे. सैनिकी कारवाई आज ना उद्या झाली तर पाकिस्तान बरबाद होईल. पण पंथीय एकतेने बांधले गेलेल्या धर्मांध मुस्लिमांनी भारताविरुध्द युध्द पुकारले तर भारतीयत्व धोक्यात येईल. धर्मांधांची सावलीही नको या मानसिकतेत आज समाज आला आहे आणि बहिष्कार हे अस्त्र पुढे आले आहे. 
 
ज्यांना भारत ही माता आणि वंदे मातरम मान्य नाही, त्यांच्याशी संपर्क नको या आजच्या स्थितीला हिंदू मुळीच जबाबदार नाहीत. जे सोसले ते सोसले आता विषाची परीक्षा नको हे धोरण यापुढे बिगर मुस्लिमांचे राहिले तर तेच भारतीयत्वाला बलिष्ठ आणि धोकाविहीन करेल. इस्लामी कट्टरतेचे दुष्परिणाम आज सारे जग सोसत आहे. आपले आस्तित्व, पिढी, देव, देश, धर्म टिकवण्यासाठी सर्व समाज आज एक होत असेल आणि कट्टरता बाजूला पडत असेल तर ती भारतीयत्व वाचवण्याची सुरुवात आहे असे म्हणावे लागेल. जीव वाचवण्यासाठी एकता महत्वाची आहे हे समाजाच्या पचनी पडलेले आहे. 
 
एक है तो सेफ आहे हा नारा देण्याने भारतीयत्वच बळकट होत आहे. भारतीयत्वाची कसोटी अडीच आघाडीवरील युद्धादरम्यान सातत्याने तावून सुलावून निघणार आहे. देशात आज पाक समर्थक आणि मुस्लीमधार्जिणे निर्लज्ज वक्तव्ये करून धुडगूस घालताहेत. हे हिंदू पाहतोय. तो काय करायचे ते योग्य वेळी करेलच.
 

Related Articles