भारतीय विमानाने पाकिस्तानचे जेएफ-१७ पाडले   

आज रात्री भारताने पाकिस्तानच्या भूमीवरून चालवण्यात जाणाऱ्या ९ दहशतवादी तळांवर मोठा हवाई हल्ला केला. भारताने २२  एप्रिल २०२५ ला झालेल्या पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर अव्यय पंधरा दिवसात दिले. दहशतवाद्यांनी देशातील बहिणी आणि मुलींचे वैवाहिक जीवन उध्वस्त केले आणि त्याचाच बदला घेण्याची वेळ आल्याने या ऑपरेशनला 'सिंदूर' हे नाव दिले गेले. दहशतवाद्यांना या सिंदूर ची किंमत आता स्वतःच्या विनाशासह चुकवावी लागणार आहे. 
 
भारतीय सैन्याने एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला केला ज्यामध्ये बहावलपूर, मुझफ्फराबाद आणि कोटली यांसारख्या भागांचा समावेश होता. वृत्तानुसार या कारवाईदरम्यान एक पाकिस्तानी जेएफ १७ हे लढाऊ विमान भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय हवाई दलाने पुलवामाच्या भागात हे लढाऊ विमान पाडले.
 
सीमेवर गोळीबार सुरूच 
 
भारताने पाकिस्तान दहशतवादी छावण्यांवर लक्ष केंद्रित केले. पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि राजुरीच्या सीमावरती भागात मोर्टार आणि तोफखान्यांसह जोरदार गोळीबार सुरू केला. पूंछमधील कृष्णा घाटी, शाहपूर आणि मानकोट यासह राजौरीतील लाम, मंजाकोट आणि गंभीर ब्राह्मणा भागात गोळीबार झाला. भारतीय लष्करही लवकरच याला चौक प्रत्युत्तर देईल.
 
पाकिस्तानने हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ५ भारतीय विमाने पाडली आहेत असा दावा केला आहे. राज्य माध्यम पीटीव्हीने दुपारी ३:४२ वाजता तिसरे भारतीय विमान पाडल्याचा दावा केला.या माहितीनुसार,पाकिस्तानी हवाई दलाने अवंतीपोराजवळ राफेल लढाऊ विमान पाडले आहे.
 
भारतीय विमानाने जेएफ-१७ पाडले
 
हे तेच लढाऊ विमान आहे जे पाकिस्तान चीनच्या सहकार्याने बनवते. JF-१७ ची लांबी अंदाजे १४.९ मीटर आहे, तर त्याच्या पंखांचा विस्तार म्हणजेच पंखांची रुंदी ९.४५ मीटर आणि उंची ४.७७ मीटर पर्यंत आहे. हे विमान जड शस्त्रे आणि इंधन वाहून उड्डाण करू शकते. त्याची मारा क्षमता सुमारे २००० किलोमीटर आहे पण तरीही हे जेट भारतीय रडार आणि क्षेपणास्त्र यंत्रणेपासून सुटू शकले नाही.

Related Articles