E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एमपीएससीच्या विरोधात बच्चू कडू उपोषण करणार
Samruddhi Dhayagude
05 May 2025
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांसाठी नोकर भरती राबविली जाते. एमपीएससीकडून पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून एमपीएससीचा कारभार बिघडला असून हजारो विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर माजी मंत्री बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांनी संताप व्यक्त करत आक्रमक पवित्र घेतला असून एमपीएससीच्या विरोधात उपोषणाला बसणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक परीक्षा घेऊन गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा नोकरी देण्याचे पवित्र काम करत आहे; पण महोदय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर फिरत असताना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी खालील प्रश्न घेऊन वारंवार भेटत आहेत. संबंधित विद्यार्थी खूप नैराश्येत आहेत. आत्महत्या करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे एमपीएससीचा कारभार सुधारण्याची गरज आहे, अनेक वेळा विनंती करुन देखिल एमपीएससी सुधारत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे खालील प्रलंबित विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत, अन्यथा एमपीएससीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. माजी मंत्री कडू यांनी सांगितले.दरम्यान, विद्यार्थ्यांचे प्रश्न एमपीएससीने एका आठवड्यात मार्गे न लावावेत, अन्यथा उपोषणाला बसल्याशिवाय काही पर्याय राहणार नसल्याचे कडू यांनी सांगितले.
यावर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला सक्षम करण्याचे आश्वासन दिले होते. ‘एमपीएससी’चे वेळापत्रक तयार केल्यानंतरही ‘यूपीएससी’प्रमाणे त्याची अंमलबजावणी होत नाही. यात सुधार करण्यावर भर दिला जाईल. भविष्यात सरळसेवा भरती परीक्षाही ‘एमपीएससी’कडून घेतल्या जाणार असल्याने मनुष्यबळ पुरवठा व सदस्यांची भरती केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. परंतु, मागे पाठ पुढे सपाट याप्रमाणे आयोगाच्या परीक्षा, निकाल, मुलाखती आणि निवड प्रक्रिया ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहे.
मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर?
एमपीएससीकडून दरवर्षी वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करते. या वेळापत्रकानुसार एमपीएससीने परीक्षा घेणे आपेक्षित आहे. मात्र परीक्षांचे वेळापत्रक एमपीएससीकडून पाळले जात नाही. राज्याच्या कानाकोपर्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, आयोगाच्या लालफिती कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे एमपीएससीला सक्षम बनवावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
Related
Articles
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
गोव्यात परिचारिकेवर बलात्कार; मिरजेतील डॉक्टरला अटक
27 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
गोव्यात परिचारिकेवर बलात्कार; मिरजेतील डॉक्टरला अटक
27 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
गोव्यात परिचारिकेवर बलात्कार; मिरजेतील डॉक्टरला अटक
27 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
गोव्यात परिचारिकेवर बलात्कार; मिरजेतील डॉक्टरला अटक
27 May 2025
राज्यात मान्सून स्थिरावला
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
राज्यात मुसळधार
5
बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत
6
श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी