कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या   

भंडारा : साकोली तालुक्यातील विर्शी येथील एका अल्पभूधारक शेतकर्‍याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली.नोगेश शालिकराम मांढरे (४७) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
 
नोगेश मांढरे यांची विर्शी शिवारात पावणेदोन एकर शेती आहे. आधीच अल्पभूधारक व त्यात आलेल्या नापिकीमुळे ते त्रस्त झाले होते. याशिवाय घराचे बांधकाम सुरू असल्याने ते मानसिक तणावात होते. मुलींचे शिक्षण व अन्य खर्च कसा भागवावा, या ते विवंचनेत होते. त्यांच्यावर विविध सेवा सहकारी संस्थेचे कर्ज आहे. नापिकी आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून नोगेश यांनी शेतातील मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
 

Related Articles