कोयनेतून विक्रमी वीजनिर्मिती   

सातारा, (वार्ताहर) : कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात ३२६९.०६ मेगावॉट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती झाली आहे. ही वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील ६७.५० टीएमसी साठ्याच्या वापरातून झाली आहे. त्यामुळे शासनाला सुमारे १४४ कोटी रुपयांचा आर्थिक लाभझाला आहे.
 
१०५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयानुसार होते. यामध्ये ६७.५० टीएमसी पाणी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी, तर ४० टीएमसी पाणी पूर्वेकडील सिंचन आणि बिगर सिंचन प्रकल्पांसाठी वापरण्यात येते. वर्षभरात पश्चिमेकडील जलविद्युत केंद्रांमधून जेवढी वीजनिर्मिती झाली, ती कोळशावर आधारित प्रकल्पांमधून केली गेली असती, तर प्रतियुनिट सरासरी ४.४० रुपये दराने १४४ कोटी रुपयांहून अधिक खर्च शासनाला करावालागला असता. 
 
कोयनेच्या पाण्याने ही बचत घडवून आणली आहे. ३१ मे रोजी कोयना धरणात २३.१२ टीएमसी (६५४.६५ दशलक्ष घनमीटर) साठा होता. त्यापैकी १८ टीएमसी (५०९.५१दशलक्ष घनमीटर) साठा जिवंत आहे. जलाशयाची पातळी २०६२.०५ मीटर नोंदवली गेली.पावसाळा अनिश्चित असतानाही प्रकल्पातील जलविद्युत निर्मितीत घसघशीत वाढ झाली, हे उल्लेखनीय ठरते. कोयना प्रकल्प केवळ वीजनिर्मितीपुरता मर्यादित नाही. 
 

Related Articles