महायुतीत आमच्या पक्षावर अन्याय   

आठवले यांची खंत

मुंबई : शरद पवारांच्या काळात काँग्रेस आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायची. मात्र, आता महायुतीत आमच्या पक्षावर अन्याय होत आहे, अशी खंत रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
 
महायुतीवर नाराजी व्यक्त करत आठवले म्हणाले, मला एक मंत्रिपद मिळाले आहे; पण माझ्या पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे. त्यामुळे मला तीन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात घेतले. मात्र, लोकसभा निवडणुकीत आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. त्या मिळाल्या नाहीत. विधानसभा आणि त्यानंतर विधान परिषदेमध्येही एकही जागा पक्षाला मिळाली नाही. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही काही पद मिळत नाही. आम्हाला एखादे महामंडळ किंवा मंत्रिपद मिळायला हवे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अनेकदा चर्चा झाली. 

Related Articles