मुंबई, (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड, नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना ४९ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी बुधवारी दिली. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बाधितांना मदत वितरीत करण्यासाठी बराच कालावधी जातो. या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करता यावी, यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार आर्थिक मदत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले. या निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार सद्यःस्थितीत कोकण विभागास ५ कोटी, पुणे विभागास १२ कोटी, नाशिक विभागास ५ कोटी असा एकूण ४९ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Fans
Followers