व्हॉट्सऍप कट्टा   

वैष्णवी.....  
 
पुण्यातील सुशिक्षित कुटुंबातील  हुंडाबळी बघितल्यावर सामाजिक सुधारणांचे काय झाले हा प्रश्न पडतो...जितकी माणसे सुशिक्षित ती जास्त क्रूर आणि रूढीवादी असे का होते आहे ? आज पोलिस अधिकारी ते विविध प्रथम द्वितीय वर्ग अधिकारी यांचे हुंड्याचे आकडे शरम आणणारे आहेत आणि मुलीचे बाप ते देतात...तेव्हा यानिमित्ताने शासकीय अधिकार्‍यांचे, आरटीओचे, परदेशात जावई असणार्‍यांच्या हुंड्याची चर्चा व्हायला हवी...ज्या खात्यात भ्रष्टाचाराची वरकमाई होऊ शकते तिथे हुंडा त्याप्रमाणात असतो....आणि त्या उघड चर्चा होतात..मुलीचे बापही कर्जबाजारी होऊन मुलीचे कल्याण होईल म्हणून तो देतात..
 
असे म्हणतात की कोल्हापूरला एक नंदीची मूर्ती आहे. तो नंदी दरवर्षी तांदळाऐवढा पुढे जातो आणि गव्हाच्या दाण्याएवढा मागे जातो...मला हे रूपक महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचे वाटते. आपण पुढे जात आहोत आणि त्याहीपेक्षा जास्त वेगाने मागे जात आहोत..ज्या महाराष्ट्रात १७५ वर्षापूर्वी मुलींची शाळा निघाली, जिथे १०० वर्षापूर्वी अनेक महिला सुधारक होऊन गेल्या..तिथे अजूनही हुंडाबळी होतात....बालविवाहाचे प्रमाण अजूनही ४ लग्नातील एक लग्न असते (२२ टक्के) आणि विधवा महिलांना अजूनही उपेक्षेची वागणूक असते...आंतरजातीय लग्न केले म्हणून मुलगी जावयाचे खून होतात.. 
ज्या महाराष्ट्रात सुधारणेचा सूर्य १७५ वर्षापूर्वी उगवला
 तिथे आज अंधार का ? 
त्या महाराष्ट्रात सुधारणेचे १५० वर्षाचे संघर्ष वाया गेले की काय...? असा प्रश्न पडतो...
 
हेरंब कुलकर्णी
मो : ८२०८५८९१९५
---------------
कचर्‍यात फेकलेले जेवण हेच दर्शवते की पोट भरून झालं की माणूस आपली लायकी विसरतो!
 
माणूस जगानं चांगलं म्हणावं म्हणून परक्यांना दान करतो आणि रक्तातल्या नात्याबाबत स्वार्थी बनतो...   
 
पार्लरमध्ये दोन्ही हातावर भरभरून मेंदी लावल्यावर त्या महिलेला आठवले की ती अ‍ॅक्टिवा घेऊन एकटीच आली होती. 
गाडीजवळ दोन्ही हात लांब करुन उभ्या असलेल्या तिच्याच सोसायटीतील व्यक्तीने तिची ही घालमेल ओळखली व तिला तिच्या अ‍ॅक्टिवावर मागे बसवून घरी सोडले. धन्यवाद वगैरे झाल्यावर त्याला आठवले की त्याची गाडी तिथेच बाजारात राहिली आणि बायको तर बाजूला भाजी घेत होती... 
 
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकालआणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
 
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
 
सत्य पण गंभीर 
एका कोंबड्याला विचारल गेलं, माणसं तुम्हाला सुखानं जगू देत नाहीत कापून खातात...
कोंबड्याचे उत्तर : लोकांना जागं करणार्‍यांचे समाजात नेहमी हेच हाल होतात.

Related Articles