केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते   

संयुक्त राष्ट्र : भारतातील दहशतवादी हल्ले केवळ आयएसआयच रोखू शकते, यासाठी भारतीय यंत्रणांना या संघटनेशी बोलावे लागेल, असे पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्रांत मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. भुट्टो यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. 
 
पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी भारताने खासदारांची शिष्टमंडळे परदेशात पाठवली आहेत. पाकिस्ताननेही आपली बाजू मांडण्याची जबाबदारी भुट्टो यांच्यावर सोपवली आहे. भुट्टो हे पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे. 
 
संयुक्क्त राष्ट्रांच्या पत्रकार परिषदेत बोलताना भुट्टो यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएस-आयच दहशतवादी हल्ले करवत असल्याचे कबुल केले आहे. भारताला आमच्या आयएसआयसोबत बसून चर्चा केल्याशिवाय दहशतवाद संपविण्याबाबत कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताने पाकिस्तानची सीमा ओलांडून निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले आहे, असा कांगावा करत भुट्टो म्हणाले, भारताने काश्मीरमधील पहलगाममधील घटनेसाठी कोणताही तपास किंवा पुरावा न देता पाकिस्तानला जबाबदार धरले, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेच्या चौकशीत मदत करण्याचा प्रस्ताव दिला होता. 
 

Related Articles