श्रीलंकेतून ११ मच्छिमारांची सुटका   

चेन्नई : श्रीलंकेच्या तुरुंगातून सुटलेले ११ भारतीय मच्छिमार गुरुवारी घरी परतले.तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने जानेवारी २०२५ मध्ये सागरी हद्दीचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तसेच त्यांच्या बोटी जप्त करण्यात आल्या होत्या. श्रीलंकेच्या तुरुंगात ते मागील चार महिन्यांपासून शिक्षा भोगत होते. 
 
या अटकेमुळे तामिळनाडूमध्ये चिंता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. या विनंतीला प्रतिसाद देत, परराष्ट्र मंत्रालयाने मच्छिमारांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी समन्वय साधला. अनेक आठवड्यांच्या राजनैतिक प्रयत्नांनंत  सर्व ११ मच्छिमारांना श्रीलंकेच्या तुरुंगातून सोडण्यात आले आणि १४ मे रोजी औपचारिकपणे भारतीय अधिकार्‍यांच्या स्वाधीन करण्यात आले.
 
त्यांना सुरक्षित मायदेशी पाठविण्यासाठी भारतीय दूतावासाच्या अधिकार्‍यांनी आवश्यक प्रवास कागदपत्रे प्रदान केली. गुरुवारी कोलंबोहून विमानाने हे चेन्नईत दाखल झाले.भारत- श्रीलंके दरम्यानच्या समुद्रात मासेमारी करताना अनेकदा मासेमारी नौका भरकटतात. जानेवारीपासून जवळपास १३० मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले होते.
 

Related Articles