एक महिना उलटूनही दहशतवादी मोकाट   

नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करणारे दहशतवादी अजून पकडले गेले नाहीत. त्या हल्ल्याला आज एक महिना होईल. अद्याप एकालाही पकडलेले नाही. दहशतवादी हल्ला करून, नागरिकांना ठार मारून दहशतवादी मोकाट फिरत आहेत. गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या हल्ल्याचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, या हल्ल्याला जवळपास एक महिना उलटला आहे. तरीदेखील अधिकारी हल्लेखोरांना पकडू शकलेले नाहीत. यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
 
जयराम रमेश म्हणाले, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा सर्व दहशतवादी मारले गेले, त्यांच्यापैकी एकाला पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर जगभरातून भारताला समर्थन मिळाले. आता मात्र दहशतवादी हल्ला करून, नागरिकांना ठार मारून मोकाट फिरत आहेत, आणि  सरकार खासदारांना जगभर पाठवून समर्थन मिळवू पाहत आहेत. दहशतवाद्यांना अटक करा, त्यांची चौकशी करा आणि त्यातून पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणा. सरकार शिष्टमंडळ पाठवून केवळ जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहे, असल्याचे त्यांनी नमूद केले. 

Related Articles