पावसामुळे बंगळुरु-हैदराबाद सामन्याचे ठिकाण बदलले   

लखनौ : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द करावी लागल्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बीसीसीआयने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील २३ मे रोजी होणारी मॅच लखनौच्या एकाना स्पोर्टस स्टेडियमवर होणार आहे. बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाली. यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला नुकसान सहन करावे लागले. ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले.
 
आरसीबीने कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळं पुढील सामना रद्द करावा लागू नये म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
 
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी बंगळुरुतील सामन्यासाठी कसोटी क्रिकेटची जर्सी परिधान करुन चिन्नास्वामी स्टेडियमवर हजर राहण्याचा संकल्प केला होता.मात्र, बंगळुरु आणि कोलकाता सामना रद्द झाला. आता दुसरा सामना लखनौला हलवण्यात आल्याने विराटच्या चाहत्यांचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.
 

Related Articles