'हवामान बदलामुळे प्रसूती दरम्यान धोका वाढतो'   

जीवाश्म इंधन जाळणे त्वरित आटोक्यात आणणे आवश्यक 

न्यूयॉर्क : वातावरण बदलाचे बरेच गंभीर परिणाम सध्या जगभरातील देशांना आणि तेथील नागरिकांना भोगावे लागत आहेत. त्यातील एक गंभीर परिणाम म्हणजे  गर्भवतींवर होणारे परिणाम. या संदर्भात एक सर्वेक्षण समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील गेल्यावर्षी जून महिन्यात याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. त्या सर्वेक्षणा नुसार, तपमान बदलामुळे मुदतपूर्व प्रसूतीची जोखीम वाढविणाऱ्या अतिउष्ण दिवसांमध्ये गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढ झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. यात सर्वाधिक वाढ विकसनशील देशांमध्ये झाली आहे. 
 
जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेच्या लाटांमुळे जगभरात गर्भधारणे दरम्यान धोकादायक गुंतागुंत होण्याचा धोका वाढत आहे. गरोदरपणात अति उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने पूर्वी बऱ्याच समस्या उद्भवल्या आहेत, ज्यामध्ये अकाली जन्म, मृत बाळंतपण, जन्मजात दोष आणि गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका वाढतो.
 
जागतिक आरोग्य संघटनेने २०२४ मध्ये मांडलेलय निष्कर्षांनुसार अतिउष्ण दिवसांचे खालील प्रमाणे परिणाम दिसून येतात. 

अर्भकांवर होणारे परिणाम 

मुदतपूर्व प्रसूती 
मृत अर्भके जन्माला येणे 

गर्भवतींवर होणारे परिणाम

उच्च रक्तदाब 
गर्भारपणातील मधुमेह 
हृदयविकाराचा झटका 
श्वसन विकारांची गुंतागुंत 

अभ्यासाचे निष्कर्ष

अभ्यास केलेल्या २४७ देश आणि प्रदेशांपैकी २२२ देशांमध्ये, "हवामान बदलामुळे गेल्या पाच वर्षांत गर्भधारणेच्या उष्णतेच्या जोखमीच्या दिवसांची सरासरी वार्षिक संख्या दुप्पट झाली आहे", असे अहवालात म्हटले आहे.
 
कॅरिबियन देश , मध्य आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक बेटे, आग्नेय आशिया आणि उप-सहारा आफ्रिका या सारख्या विकसनशील देशांमध्ये आरोग्यसेवा सक्षम नसताना धोका वाढल्याने सर्वात मोठी वाढ झाली. संशोधकांनी केवळ प्रसूतीशी संबंधित गुंतागुंत वाढविणाऱ्या अति उष्ण दिवसांचा अभ्यास केला. त्यामुळे प्रत्येक देशांत प्रत्यक्ष काय परिणाम झाला हे तपासलेले नाही. 
 
अमेरिकास्थित संशोधन गट 'क्लायमेट सेंट्रल'च्या संशोधकांनी 'यूएसए सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' या संस्थेच्या अहवालाचा दाखला दिला. 
केवळ एका अतिउष्ण दिवसामुळे प्रसूतीची गुंतागुंत वाढू शकते त्यातून मुदतपूर्व बालके जन्माला येऊ शकते, नवजात अर्भकाच्या आरोग्यवर दीर्घकालीन परिणाम याच बरोबर मातामृत्यू धोका संभवतो. असेही अहवालात नमूद केले आहे. 

भारतात उष्णतेचा परिणाम

या कालावधीत भारतात दरवर्षी सरासरी सहा अतिरिक्त गरोदरपणातील उष्णतेच्या जोखमीचे दिवस अनुभवले, असे संशोधकांनी सांगितले. हवामान बदलामुळे सिक्कीममध्ये सर्वाधिक ३२ दिवस गर्भधारणेच्या उष्णतेच्या जोखमीचे दिवस आढळले. गोवा आणि केरळमध्ये अनुक्रमे २४ आणि १८ अतिरिक्त दिवसांची नोंद झाली.
 
या सर्वेक्षणात समाविष्ट शहरांमध्ये, पणजीमध्ये गेल्या पाच वर्षांत दरवर्षी सरासरी सर्वाधिक (३९) अतिरिक्त गर्भधारणेच्या उष्णतेच्या जोखमीच्या दिवसांची नोंद झाली. त्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये असे ३६ दिवस आले. २०२०-२०२४ दरम्यान हवामान बदलामुळे मुंबईत २६ अतिरिक्त गर्भधारणेच्या उष्णतेच्या जोखमीचे दिवस नोंदवले गेले. गेल्या पाच वर्षांत चेन्नई, बेंगळुरू आणि पुणे येथेही हवामान बदलामुळे सात अतिरिक्त गर्भधारणेच्या उष्णतेच्या जोखमीचे दिवस नोंदवले गेले.

उष्णतेचा संपर्क आणि संबंधित आरोग्य धोके

या अभ्यास गटात सहभागी नसलेल्या एका संशोधक महिलेने आणखी एका वयोगटावर होणारा परिणाम सांगितला. 'लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन'मधील मातृ आरोग्य आणि अति उष्णतेचे संशोधक ऍना बोनेल म्हणाल्या की, "अति उष्णतेच्या वाढत्या संपर्काच्या धोक्याचे स्पष्ट पुरावे देतात". हे निष्कर्ष वृद्धांना देखील लागू होऊ शकतात.'' 
 
नेचर मेडिसीनमधील २०२४ च्या एका मोठ्या अभ्यासात असा अंदाज आहे की, उष्णतेच्या लाटांमुळे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता १.२५ पट वाढल्याचा उल्लेख आहे.

काय करणे आवश्यक आहे

हवामान बदलाशी लढण्यासाठी व्यापक प्रयत्नांव्यतिरिक्त जे प्रामुख्याने मानवांनी जीवाश्म इंधन जाळल्यामुळे होते 
तज्ञांनी स्थानिक धोरणांचा सल्ला दिला जेणेकरून सर्वांनाच उष्णतेवर मात करण्यास मदत होईल. 
यामध्ये "परिसर हिरवे करणे, प्रदूषण मर्यादित करणे, थंड क्षेत्रे तयार करणे आणि रहिवाशांना धोक्यांबद्दल माहिती देणे" समाविष्ट आहे, असे फ्रेंच साथीच्या रोगतज्ज्ञ लुसी ऍडलेड म्हणाल्या.
 
नवीन अहवालाशी जोडलेल्या एका निवेदनात, एक अशी शिफारस देखील केली आहे की, उष्णतेच्या लाटांच्या आरोग्य धोक्यांबद्दलच्या दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये गर्भवती महिलांसाठी इशारे समाविष्ट करावेत, ज्यांचा सध्या अशा प्रयत्नांमध्ये क्वचितच उल्लेख केला जातो.'

हवामान बदलाचा गर्भधारणेच्या जोखमींवर परिणाम होतो

गर्भधारणे दरम्यान उच्च तापमानामुळे उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह, रुग्णालयात दाखल होणे, गंभीर आजार, बालमृत्यू आणि मुदतपूर्व जन्म यासारख्या गुंतागुंतीच्या जोखमी वाढतात, ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर पुढे आयुष्यभर परिणाम होऊ शकतात, असे संशोधनात म्हटले आहे.
 
"जगभरातील गर्भवती महिलांसाठी अति उष्णता हा सर्वात मोठा धोका आहे, ज्यामुळे गर्भधारणा उच्च-जोखीम क्षेत्रात वर्ग केली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः अशा ठिकाणी जिथे मर्यादित आरोग्यसेवा आहे. 
 
''जीवाश्म इंधन उत्सर्जन कमी करणे हे केवळ ग्रहासाठी चांगले नाही, तर जगभरातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे," असे महिला आरोग्य चिकित्सक आणि मानवी आरोग्यासाठी हवामान बदलाच्या धोक्यांवरील अधिकारी ब्रूस बेकर म्हणाले.
 
"अति उष्णतेचा एक दिवसही गंभीर गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा धोका वाढवू शकतो," असे क्लायमेट सेंट्रलच्या विज्ञान उपाध्यक्ष क्रिस्टीना डहल म्हणाल्या. हवामान बदलामुळे जगभरात तीव्र उष्णता वाढत आहे आणि निरोगी गर्भधारणा होण्याच्या शक्यता कमी होत आहेत, विशेषतः अशा ठिकाणी जिथे काळजी घेणे आधीच कठीण आहे. जर आपण जीवाश्म इंधन जाळणे थांबवले नाही आणि हवामान बदलाला तातडीने उपाय केले नाही तर माता आणि बाळाच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या.
 

Related Articles