राम मंदिरातील २५० सुरक्षारक्षक हटवले   

लखनौ : अयोध्येतील श्रीराम मंदिरात येणार्‍या लाखो भाविकांच्या ओघामुळे सुरक्षारक्षकांची मोठी तैनाती करण्यात आली होती. मात्र, सध्या भाविकांची गर्दी कमी झाल्याने मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने २५० सुरक्षारक्षक कमी केले आहेत. 
 
महाकुंभमेळ्याच्या काळात एसआयएस या खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत ४५० सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. मात्र, आता गर्दीचा ओघ कमी झाल्याने मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने या व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. एसआयएसने तब्बल २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले. त्यांचे प्रवेश पासही रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात अतिशय संवेदनशील जबाबदार्‍या सांभाळणार्‍या महिला सुरक्षा कर्मचार्‍यांचाही यात समावेश आहे. यासंदर्भात मंदिर प्रशासनाने बोलणे टाळले. 

Related Articles