विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वास गमावू नका   

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन

पुणे : दहावी व बारावीचा टप्पा करिअरच्या दृष्टीने महत्वाचा असला, तरी या परीक्षांमधील निकाल सर्वस्वी नसतो. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत अपयश आले किंवा कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. आपला आत्मविश्वास न गमावता मोकळेपणाने बोलून अन्य पर्यायांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्ट संस्थेच्या वतीने करण्यात आले. 
 
कनेक्टिंग ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी निःशुल्क भावनिक आधार सुविधा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत या वेळेत ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करता येतील. लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिणार्‍यांनी distressmailsc onnectinggmail.com यावर त्यांची समस्या लिहून पाठवता येईल, असे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी नमूद केले.

Related Articles