विकास दर ६.५ टक्के राहणार   

मुंबई : चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) देशाचा विकास दर ६.५ टक्के राहणार असल्याचा अंदाज रिझर्व बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर असून अनेक संधीही उपलब्ध आहेत, असे मल्होत्रा यांनी सांगितले. देशाचा विकास दर एप्रिल-जून या तिमाहीत २.९ टक्के, दुसर्‍या तिमाहीत ३.४ टक्के, तिसर्‍या तिमाहीत ३.९ टक्के आणि  चौथ्या तिमाहीत ४.४ टक्के  विकास दर राहील, असेही ते म्हणाले.
 
लष्करी संघर्षाचा फारसा परिणाम नाही
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात लष्करी संघर्ष झाला. या संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खूपच नगण्य परिणाम झाला, असे मल्होत्रा यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवित पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, पाकिस्तानने हवाई आणि ड्रोन हल्ले सुरु केले. भारताने ते सर्व परतावून लावतानाच पाकिस्ताला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर पाकिस्तानने नमते घेतले.

Related Articles