संघर्षबंदीला १८ मे पर्यंत मुदतवाढ   

नवी दिल्ली / इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानने १८ मे पर्यंत संघर्षबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दोन्ही देशांच्या  लष्करी कारवाई महासंचालकांची बैठक नुकतीच झाली.
 
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ मे रोजी भारताने चार दिवस आक्रमक सैन्य कारवाई केली. त्यानंतर नरमलेल्या पाकिस्तानने १० मे रोजी संघर्षबंदी करण्याची विनंती केली होती. यानंतर १२ मे पर्यंत संघर्षबंदीचा निर्णय घेतला होता. यानंतर पुन्हा चर्चा झाल्यावर मुदत १४ मे पर्यंत वाढविली होती. आता मुदत १८ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अंतर्गत  या कालावधीपर्यंत दोन्ही देशांचे सैन्य सीमारेषेचे उल्लंघन करणार नाहीत. तसेच एकमेकांवर गोळीबार अथवा हल्ले करणार नाहीत, असे ठरले आहे. 
 

Related Articles