E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी बुधवारपासून अर्ज
Wrutuja pandharpure
19 May 2025
पुणे
: राज्यभरात यंदा पहिल्यांदाच अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातील ९ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेता येईल.
गेल्या वर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या पाच विभागांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित राज्यभरात महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येत होती. मात्र, शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यभरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करून त्यावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. तर विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात, पहिली फेरी दोन दिवस विलंबाने सुरू होत असल्याचे दिसून येत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अकरावीच्या प्रवेशाची पहिली फेरी २१ मे पासून सुरू होणार आहे. २१ ते २९ मे कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचे किमान एक ते कमाल दहा प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी जाहीर केली जाणार आहे. यादीवर १ जूनपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन ६ ते १२ जून या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
अर्ज भरण्याच्या सरावासाठी दोन दिवस
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानुसार १९ आणि २० मे रोजी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, प्राधान्यक्रम नोंदवण्याचा सराव करू शकणार आहेत. त्यानंतर २१ मे रोजी नव्याने अर्ज भरावा लागणार आहे. राखीव कोट्यातील प्रवेश ३ जूनपासून पहिल्या फेरीसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना अंतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यातील राखीव जागांसाठीही अर्ज करता येणार आहे. या राखीव जागांवरील प्रवेश ३ जूनपासून देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश शुल्क ‘ऑनलाइन’द्वारेच
कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या प्रवेश शुल्काची रक्कम ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी लागणार आहे. त्याबाबतचे निर्देशही डॉ. पालकर यांनी दिले आहेत.
आवश्यक कागदपत्रांची यादी
इयत्ता दहावी, समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला ं नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
ईडब्लूएस पात्रता प्रमाणपत्र ं दिव्यांग प्रमाणपत्र
प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र ं आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र
अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग
यांचे प्रमाणपत्र
परदेशातून येणार्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक
असा करा अर्ज :
अकरावीचा अर्ज दोन भागात भरायचा आहे. पहिल्या भागात विद्यार्थ्यांना स्वत:चे, आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख, जात प्रवर्ग (आरक्षणानुसार) आणि ऑनलाइन शुल्क भरावे (१०० रुपये) लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे (एक एमबीपेक्षा जास्त आकार नसावा) अपलोड करावीत. अर्ज लॉक करण्यापूर्वी तो प्रमाणित करण्यासाठी शाळेतील शिक्षक किंवा मार्गदर्शन केंद्रांची मदत घ्यावी. भाग १ भरल्यानंतर डॅशबोर्ड तपासावा. तेथे अर्ज व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी अर्ज व्हेरिफाय करून घेणार नाहीत त्यांचा अर्ज अपूर्ण राहील व तो अर्ज प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल. अर्जाचा भाग २ भरताना विद्यार्थी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे त्याचा पसंतीक्रम टाकणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांने एकूण दहा महाविद्यालयांची एक ते दहानुसार निवड करावी. ही यादी सबमिट केल्यानंतर ती लॉक करावी. एकदा लॉक केल्यानंतर ती बदलता येणार नाही. प्रत्येक प्रवेश फेरीत महाविद्यालयांच्या रिक्त जागांची माहिती दिली जाते. मागील वर्षातील कटऑफ व प्रवेश धोरणे तपासून निर्णय घेणे गरजेचे आहे. भाग २ लॉक केल्यानंतर विद्यार्थी अधिकृतपणे प्रवेश प्रक्रियेस पात्र ठरतील.
Related
Articles
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर