ट्रम्प यांच्या दाव्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारला प्रश्न विचारु : खर्गे   

कलबुर्गी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कोणत्या दाव्यांवर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला, असा प्रश्न सर्वपक्षीय बैठक बोलविल्यास विरोधी पक्षाकडून सरकारला विचारण्यात येईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी सांगितले. 
 
खर्गे म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामावेळी सरकारने कोणत्या दाव्यांवर चर्चा केली. हे केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून सांगावे. या युद्धविरामाचे श्रेय ट्रम्प घेत असून, ते अनेक दावे करत आहेत. मात्र, सरकार यावर काहीच बोलत नाही. ही एक संवेदनशील बाब आहे. त्यामुळे सरकार ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक बोलवेल तेव्हा आम्ही या प्रकरणाबाबत सरकारला प्रश्न विचारणार आहे. नक्की काय घडले आणि ट्रम्प यांच्यासोबत फोनवर काय चर्चा झाली? असे अनेक प्रश्न आम्ही सरकारला विचारणार आहोत. भारत-पाकिस्तानच्या प्रश्नांमध्ये ट्रम्प मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे सांगत आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांना मान्य केले आहे का? असे विचारले असता, खर्गे म्हणाले, आताच याबद्दल मी बोलणे योग्य ठरणार नाही. आज आमच्या पक्षाच्या बैठकीसाठी येथे आलो आहे. याबाबत मी सर्वपक्षीय बैठक केंद्र सरकारला प्रश्न विचारेन, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यातील चर्चेनंतर लष्करी कारवाई थांबवण्याचा करार झाला, यात दोन्ही देशांमध्ये कोणत्याही तिसर्‍या पक्षाचा सहभाग नव्हता, असे भारत सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे, की त्यांनी या दोन्ही देशांसोबत व्यापार थांबवण्याची धमकी देत संघर्ष थांबवण्यासाठी दबाव आणला.
 

Related Articles