आठ हजार एक्स खाती बंद करण्याचा केंंद्राचा अध्यादेश   

नवी दिल्‍ली : भारतातील आठ हजारांवर एक्स खाती बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या संदर्भातील अध्यादेश काढण्यात आले असून खाती तातडीने बंद करण्याची प्रक्रिया राबविली आहे.
 
सरकारच्या ग्लोबल एक्सवरील पोस्टमध्ये खाती बंद केली जात असल्याचे सरकारने जाहीर केले. अध्यादेशात नमूद केले की, देशातील 8 हजार हून अधिक खाती बंद करण्याची  तरतूद आणि कंपनीच्या स्थानिक कर्मचार्‍यांना मोेठा दंड आणि तुरुंगवास देखील भोगावा लागेल. अनेक खातेदारांनी नियमांची पायमल्‍ली केली आहे. अनेक खाती बंद करण्याबाबत कोणतेही ठोस कायदेशीर कारण अथवा देण्याची गरज नसल्याचे नमूद केले आहे. काही  विशेष खाती बंद करण्याचे भारताला अधिकार आहेत, असेही अध्यादेशात नमूद केले आहे.

Related Articles