E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
जयपूरच्या मैदानामधून पाकिस्तानी खेळाडूंची नावे, फोटो काढून टाकले
Samruddhi Dhayagude
21 May 2025
जयपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव दिसून आला. भारताने मोठी कारवाई केली आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अनेक दहशतवाद्यांना ठार केले. यानंतर, पाकिस्तानने भारतावर अनेक हल्ले केले, परंतु भारतीय हवाई संरक्षण दलाने ते सर्व प्रयत्न हाणून पाडले. या काळात अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंनी भारताविरुद्ध गरळ ओकली. त्यामुळेच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मोठी कारवाई करण्यात आली.
जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममधील ’वॉल ऑफ ग्लोरी’वरून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. या मैदानावर खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे फोटो सवाई मानसिंग स्टेडियममध्ये लावण्यात येतात. पाकिस्तानने येथे एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यामुळे एकूण २५ पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो ’वॉल ऑफ ग्लोरी’चा भाग होते. पण राजस्तान क्रिकेट असोसिएशनने (आरसीए) सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी दर्शवते.
असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले होते. या २५ खेळाडूंमध्ये पाकिस्तानकडून खेळणारा शेवटचा हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाचाही समावेश आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दानिश कनेरियाने पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर उघडपणे टीका केली होती.
यासोबतच त्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो असा आरोपही केला होता. तरीही पाकिस्तानी संघाचा भाग असल्याने त्याचाही फोटो हटवण्यात आला.
दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी एकूण ७९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कनेरिया हा पाकिस्तानचा खास फिरकी गोलंदाज होता, ज्याने ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळले. या काळात त्याने कसोटी सामन्यांमध्ये ३४.७९ च्या सरासरीने २६१ बळी घेतल्या. त्याच वेळी, त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ बळी आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघात हिंदू असल्याने त्याच्याशी भेदभाव करण्यात आला होता, असे त्यानेच उघडपणे सांगितले होते.
Related
Articles
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त