गीत रामायण हे असामान्य काव्य   

डॉ. अरूणा ढेरे यांचे प्रतिपादन 

पुणे : वाल्मीकींच्या रामायणावर आधारित असले, तरी ग. दि. माडगूळकर यांची अलौकिक प्रतिभा ‘गीत रामायणा’ला असामान्य काव्याचा दर्जा देऊन गेली. म्हणूनच ‘वाल्मीकीच्या भास्कराचे गदिमांच्या रूपाने झाले चांदणे मराठी’ असे म्हटले जाते ते किती सार्थ आहे, याची प्रचिती गेली सात दशके आपण घेत आहोत, असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्रातर्फे आयोजित ‘बहुरूपी रामकथा:अभिजात आणि प्रादेशिक’ या व्याख्यान मालिकेचा समारोप ‘गीत रामायणाचे काव्यसौंदर्य’ या विषयावरील डॉ. अरूणा ढेरे यांच्या व्याख्यानाने झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. चैत्राली अभ्यंकर यांनी ‘गीत रामायणा’तील काही गीते सादर केली. 
 
डॉ. ढेरे म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये राम म्हणजे सुख आणि आयुष्याचा अर्थ. म्हणून आपण ‘जीवनात राम नाही’ असे म्हणतो. रामायणामध्ये राम आणि आयन हे दोन शब्द आहेत. आयन म्हणजे प्रवास. गदिमांच्या गीत रामायणाचा प्रभाव आपल्यावर इतका होती, ती गीत ऐकताना रेडिओला हार अर्पण केला जात असे. गदिमांचे गीत आणि सुधीर फडके यांचे संगीत अशा सुंदर मिलाफातून ही अजरामर कलाकृती जन्माला आली. गीत रामायणाच्या निर्मितीतून या दोघांच्या आयुष्याचे सार्थक झाले. अदभुत कलाकृती जन्माला आली. हे गीतात्मक आख्यान ऐकताना आपण श्रीमंत होतो. गदिमांच्या शब्दसृष्टीने गीत रामायण हे सामान्य काव्य राहिले नाही, तर ते मर्यादा पुरूषोमाचे चरित्र झाले. 
 
राम हा फक्त दशरथाचा नाही, तर सार्‍या समाजाचा आहे. अशक्ष भावना मांडणार्‍या गदिमांचा भाषिक आविष्कार वेधक तर आहेच पण, काव्याचा अर्थविस्तार मनोहारी आहे. पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व या दोन छावण्यांच्यामध्ये झेंडे उभारलेले असताना एक मोकळा प्रदेश असतो. त्याला ‘नो मॅन्स लँड’ समजण्याची चूक आपल्याकडून होते. पण, याच प्रदेशात समन्वयशील विवेकवतांच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिवसात. आपल्याला त्या पाऊलखुणशंचा मागोवा घेत जायला हवं. गदिमांसारखा कलावंत त्याच पाऊळखुणांचा शोध घेताना दिसतो, असेही डॉ.  ढेरे यांनी स्पष्ट केले.

Related Articles