..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील   

लखनौ : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेतल्यास  पक्षाचे ’अच्छे दिन’ परत येतील, असे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी सांगितले. 
 
पत्रकार परिषदेत बोलताना मायावती म्हणाल्या,  राष्ट्रीय राजकारणात बसपाची उपस्थिती कमीत कमी राहावी यासाठी प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष विविध युक्त्या अवलंबत आहेत. सत्तेत आणि विरोधी दोन्ही ठिकाणी जातीय विचारसरणी असलेले पक्ष दलित आणि इतर उपेक्षित समुदायातील काही संधीसाधू आणि स्वार्थी व्यक्तींना पडद्यामागे सांभाळत आहेत.हे पक्ष केवळ संधीसाधू संघटना निर्माण करत नाहीत तर निवडणुकीत त्यांच्या काही उमेदवारांना जिंकण्यासाठी त्यांची मते त्यांच्याकडे हस्तांतरित करत आहेत. त्यामुळे बसपा कमकुवत होत आहे. 
 
या शिवाय, बसपाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी ईव्हीएममध्ये फेरफार केला जात आहे. बसपासह बहुतेक विरोधी पक्षांची मागणी सर्व निवडणुका पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेतल्यास बसपाला ’अच्छे दिन’ परत येतील.

Related Articles