आंबोली आदिवासी भागात पिकाचे सर्वाधिक नुकसान   

जुन्नर, (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबोली व पंचक्रोशीतील अवकाळी वादळी वार्‍यासह पावसाने संपूर्ण परिसर झोडपला असून आदिवासी भागातील हिरडा पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हिरड्याला बुरशी आली आहे. बाजरी काढणे बाकी असतांना कणसांनाच पुन्हा मोढ आले आहेत. 
 
ज्या शेतकर्‍यांनी बाजरी काढली ती देखील पावसामुळे वाळली नसल्याने काळी पडली आहे. ज्या शेतकर्‍यांचे शेतातच कांदे व बटाटे होते त्यांचे ही नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहेत. आदिवासी पश्चिम भागात मान्सून पूर्वीची सर्व शेतीचे कामे पेरणी, बांध घालणे इतर सर्वच कामे रखडलेले आहेत, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे..
 

Related Articles