कास पठारावर जाळी बसवण्यास सुरुवात   

पर्यटकांची वर्दळ वाढली : हंगामातील फुले वाचवण्यासाठी कार्यवाही

सातारा, (प्रतिनिधी) : जागतिक वारसास्थळ असलेले कास पुष्प पठार परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पर्यटकांना खुणावू लागले आहे. काही प्रजातींनी फुलेही पठारावर उमलल्यामुळे पर्यटकांची वर्दळ ही बाडू लागली आहे. ऑगस्ट महिन्यात काय हंगामाला सुरुवात होते. त्या फुलांची उमलण्याची सुरुवात आता होवू लागली आहे. ही फुले उमलण्यात कोणता अडथळा येवू नये व पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण रहावे, यासाठी कास पठार कार्यकारी 
समितीकडून तंगुसाची वाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
 
गतवर्षी जून महिन्यानंतर कासपुष्प पठारावरील हंगामाच्या तयारीची सुरुवात करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यळ्याच्या पावसामुळे परिस्थिती बदलली आहे.  या मुळेच आतापासून समितीच्या कर्मचार्‍यांना पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज भासू लागली आहे. कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम दरवर्षी एक सप्टेंबर रोजी सुरू करण्यात येतो. मात्र, यावर्षी वळवाच्या पावसाने कास पठार परिसर बहरून गेला आहे. त्यामुळे केवळ फुलेच पाहण्यासाठी नव्हे तर या भागातील अल्हाददायक वातावरण, धुके याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहे. त्यामुळेच इतक्या लवकर जाळी लावण्याची गरज भासली. पठाराबरोबरच छोटे-छोटे धबधबे, कास धरण, बामणोली या भागात पर्यटकांची आता रेलचेल बाडू लागली आहे. 
 
नैसर्गिक वातावरण वेगळे असल्याने हा हंगाम कोणत्या कालावधीत सुरू करण्यात येईल, हे कोडे आहे. मात्र, कास पुष्प पठारावर गेल्या काही दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे पठारावरील छोटी मोठी फुले उमलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुट्टीच्या व इतर दिवशी पर्यटक पठारावर गर्दी करत आहेत. पठारावरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक पोल फक्त उभे होते त्याला जाळी नसल्याने पर्यटक संपूर्ण पठारावर फिरत होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या फुलांच्या कळ्यांवर पाऊल पडून फुलांचे नुकसान होत होते. या गोष्टी कास पठार कार्यकारी समितीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा तंगुसाची जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Related Articles