उत्तर प्रदेशात चार मुली बुडाल्या   

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात चार मुलींचा बकुलाही नदीत बुडून मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास कुंदा पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील चेतीसिंह पुरवा गावात ही घटना घडली.
 
स्वाती (१३), संध्या (११) आणि चांदणी (६) या तीन बहिणींसह त्यांची मैत्रीण प्रियांशी (७, सर्व रा. जलालपूर दिहवा, प्रतापगड) अशी मृत मुलींची नावे आहेत. या मुली गुरूवारी सकाळी भिंतींना लावण्यासाठी चिखल गोळा करण्यासाठी नदीकडे गेल्या होत्या. नदीच्या काठाजवळ चिखल गोळा करताना  त्यांनी पाण्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या.    

Related Articles