मोदी आणि शहांनी बाळासाहेब व शरद पवारांच्या उपकाराची परतफेड त्यांचे पक्ष फोडून केली   

संजय राऊत यांची टीका

मुंबई, (प्रतिनिधी) : गोध्रा दंगलीच्यावेळी नरेंद्र मोदी व अमित शाह यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच वाचवले होते. राजकारण न करता बाळासाहेब व पवारांनी त्यांना मदत केली होती. मात्र या उपकरणाची जाण न ठेवता, त्यांनी या दोघांचे पक्ष फोडले, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.
 
राजकीय सुडापोटी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. ईडीने अटक केल्यानंतर राऊत यांना तीन महिने आर्थर रोड येथील तुरुंगात राहावे लागले होते. तुरुंगात असताना आलेल्या अनुभवाचे थरारक चित्रण ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केले असून राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह यांना तडीपारीच्या काळात केलेल्या मदतीची विस्तृत माहिती पुस्तकात मांडली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन आज (शनिवारी) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वा. होणार आहे. 
 
या प्रकाशन सोहोळ्याला ज्येष्ठ पटकथाकार लेखक जावेद अख्तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुस्तकातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. राऊत म्हणाले, १०० दिवसांपेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो.
 

Related Articles