व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठीच चर्चा होईल   

जयशंकर यांनी फटकारले; सिंधू करार स्थगितच

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी होईल. अन्य विषयांवर ती होणार नाही. तसेच चर्चा  ही दोन देशांत होणार आहे. तिसर्‍या देशाच्या मध्यस्थीची भारताला गरज नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी गुरुवारी भारताची भूमिका स्पष्ट केली. तसेच पाकिस्तान आणि मध्यस्थी करणार्‍या देशांंना फटकारले. तसेच सिंधू करार स्थगितच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
 
दिल्लीतील होंडुरास दूतावासाचे उद्घाटन डॉ. जयशंकर यांच्या हस्ते काल झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या प्रसंगी त्यांनी पाकिस्तानसोबतच्या दहशतवाद आणि व्याप्त काश्मीर शिवाय अन्य विषयावर कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचे पकिस्तानला बजावले आहे 
डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानशी आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. हे वर्षानुवर्षे त्यावर राष्ट्रीय एकमत आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच होईल.
 

Related Articles