व्हॉट्सऍप कट्टा   

मोबाइल इतका स्मार्ट कशामुळे झाला?

खूप काही खाल्लं आहे या मोबाइलनं. याने हाताचं घड्याळ खाल्लं. याने टॉर्च-लाईट खाल्ला. याने चिठ्या-पत्रे खाल्ली. पुस्तक खाल्लं. रेडिओ खाल्ला. टेप रेकॉर्डर खाल्ला. कॅमेरा खाल्ला. कॅल्क्युलेटर खाल्ला. याने मैत्री खाल्ली. भेटीगाठी खाल्ल्या. आपलं सुख समाधान खाल्लं. आपला वेळ खाल्ला. पैसे खाल्ले. नाती खाल्ली. आठवण खाल्ली. याने आरोग्य खाल्लं व एवढं सर्व खाऊन तो स्मार्ट बनलेला आहे.बदलणार्‍या जगावर असा परिणाम होऊ लागला. माणूस वेडा आणि फोन स्मार्ट होऊ लागला. जोपर्यंत फोन वायरने बांधला होता, माणूस स्वतंत्र होता. आता माणूस फोनला बांधला गेला!बोटंच निभावतात आता नाती. भेटायला-बोलायला वेळ कोणाला आहे? सर्व टच करण्यात बिझी आहेत. परंतु टच मध्ये कोणीच नाही... हेच सत्य आहे!
 
एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता. तुमची प्रगती रोखणार्‍या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामील व्हा. सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकार्‍या बद्दल वाईट वाटलं. पण नंतर उत्सुकता वाढली, माझी 
 
प्रगती रोखणारा नक्की कोण?
 
यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला. शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.
कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता. शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता, या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखू शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वत:! कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता. तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच. आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसर्‍याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही. दुसर्‍याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल? तुम्ही तेव्हाच मोठे होऊ शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.

Related Articles